K Chandrashekar Rao esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : मोठ्या राजकीय पक्षांना KCR घाम फोडणार; चंद्रशेखर राव यांना हवेत नऊ माजी आमदार!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ताकदीने उतरू, अशी घोषणा त्यांनी केली.

अजित झळके

प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही; तर अपक्ष लढण्यापेक्षा नवा पर्याय म्हणून भारत राष्ट्र समितीकडे पाहता येईल, असेही काहींनी स्पष्ट केले.

सांगली : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक (Maharashtra Assembly Election) मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातून विधानसभेसाठी आठ आणि लोकसभेसाठी एक अशा नऊ माजी आमदारांची त्यांना गरज आहे.

त्यासाठी बहुतांश माजी आमदार आणि विधानसभा लढण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना हैदराबाद भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तेलंगणालगतचे राज्य असल्याने चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाल्या.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ताकदीने उतरू, अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर लागलीच राज्यभर श्री. राव यांचे बॅनर लागले आहेत. सांगली शहर जिल्ह्यात किमान शंभर ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. हिंदी आणि मराठीतून तेलंगणाच्या विकासाच्या जाहिराती झळकत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर आता लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. त्यात प्राधान्याने विधानसभा लढवलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना गळ घालण्यात आली आहे. त्यांच्यासमोर प्राथमिक प्रस्ताव ठेवण्यात आला असून, सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांना तेलंगणाची राजधानी हैदराबाद भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील काही माजी आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर त्यांना संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले. भारत राष्ट्र समिती हा नवीन पक्ष आहे, त्यांची जाहिरातबाजी जोरदार असली तरी तो रुजेल का, वाढेल का, काय स्थिती राहील, याबाबत काहीच अंदाज नसल्याने तो प्रस्ताव ऐकून घेतला आहे, असेही काहींनी स्पष्ट केले. प्रमुख राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही; तर अपक्ष लढण्यापेक्षा नवा पर्याय म्हणून भारत राष्ट्र समितीकडे पाहता येईल, असेही काहींनी स्पष्ट केले. त्यामुळे राव यांच्या ‘एंट्री’ने इच्‍छुकांना नवा पर्याय मिळाल्याचे मानले जात आहे.

शेतकरी केंद्रस्थानी, ग्रामीण मतदारांवर लक्ष

के. चंद्रशेखर राव यांनी शहरी मतदारांप्रमाणेच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून रचना केली आहे. ‘अब की बार, किसान की सरकार’, असा नारा त्यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग ग्रामीण आणि शेतकरी प्रभावित आहे. त्यामुळे राव यांच्या ‘थिंक टँक’ला येथे प्रभाव पडण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT