Arvind Sawant 
महाराष्ट्र बातम्या

कौरव-पांडव भाऊ-भाऊच होते, पण युद्धात धर्म-अधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे; सावंत यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात विरोधकांची इंडिया आघाडी तयार झाली आहे. या आघाडीत उद्धव ठाकरे गटाची शिवसेना सामील झाली असून मुंबईत याच महिन्यात इंडिया आघाडीची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीवर भाष्य केलं.

मोदींनी स्वातंत्र्य दिनी केलेलं भाषण पंतप्रधान म्हणून केले की भाजपचे नेते म्हणून केलं ? असा प्रश्न उपस्थित करत सावंत म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीसाठी मोदी यांचं कालचं भाषण होत. त्यांना कळलं की इंडिया आघाडी आता त्यांना मोठं आव्हान देणार आहे. महाराष्ट्र सदनमधील बैठकीतच त्यांनी सांगितलं होतं की, भाजपने नाही शिवसेनेने युती तोडली. सावंत पुढं म्हणाले की, मोदींचं शिवसेनेकडे सगळ्यात जास्त लक्ष आहे. शिवसेना कोणाची असेल तर ती उद्धव ठाकरेंची आहे हे पंतप्रधान मोदींना सुद्धा कळलं आहे.

महापालिका निवडणुका अजूनही होत नाहीये, याचा अर्थ लोकशाही नाहीये. महापालिका निवडणूक होणार नाही, आता लोकसभा निवडणुका होतील, त्यामुळे तशा प्रकारे लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला जात असल्याचंही सावंत यांनी सांगितलं.

शरद पवार-अजित पवार भेटीवर सावंत म्हणाले की, संभ्रम निर्माण केला आहे. ज्यांनी तो निर्माण केला, त्यांनी त्यांचं निवारण करायला पाहिजे. महाभारताच्या युद्धात कौरव आणि पांडव भाऊ-भाऊ होते. मात्र धर्मअधर्माचा निर्णय घेता आला पाहिजे, असंही सावंत म्हणाले.

दुसरीकडे शरद पवार यांनी आपण इंडिया आघाडीत असल्याचं आज स्पष्ट केलं आहे. तसेच भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : भगूर शहरात रेल्वे उड्डाणपुलावरून मोठा वाद

सासरी सोन्याच्या चमच्याने जेवतात या ६ अभिनेत्री; सिनेमांपासून दूर पण प्रॉपर्टी इतकी की बुर्ज खलिफाही विकत घेतील

Pargaon News : अंकिता वाळुंज या ठरल्या सर्वात कमी वय असलेल्या विजयी उमेदवार

Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

SCROLL FOR NEXT