Bharat Rashtra Samithi esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एंट्री; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिली जाहीर सभा

रुपेश नामदास

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने महाराष्ट्रात एंट्री केली आहे. तेलंगानाच्या लगत असलेला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नांदेडमध्ये पक्ष वाढीचा शुभारंभ केला आहे. आज केसीआर यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दर्शवला.

यावेळी केसीआर यांनी 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणा दिली आहे. सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं.

तर त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली, ते म्हणाले मागील ७० वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतीच कामे केली नाहीत. आत्ता पर्यंत सगळे आमदार-खासदार झाले पण आता शेतकऱ्याला पुढे यावं लागेल.

देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचं केसीआर यांनी यावेळी सांगितलं. देशाला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी देखील अजून पर्यंत देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नाही.

शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा नाहीत. तर त्यांनी पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, गावात जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करणार असल्याचे सांगितले. तर शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरीवर जाऊन शपथ घेऊन पक्षवाढीसाठी सुरूवात करणार असल्याची माहिती चंद्रशेखर राव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT