maratha reservation protest 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा; कुणबी सेनेची अजब मागणी

रोहित कणसे

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आदोलन सुरू असून राज्य सरकार त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना अटक करा अशी मागणी कुणबी सेनेचेो महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबद्दल पत्र लिहीलं आहे.

मराठा आराक्षणासाठी जरांगे यांचं मागील १३ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. यादरम्यान राज्य सरकारकडून जरांगे यांच्यासोबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेतून तोडगा निघाला नाही. यानंतर काही दिवसांपूर्वी (७ सप्टेंबर) राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात एक जीआर काढला होता.

मात्र त्यातील वंशवाळीचा मुद्दा हटवावा तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्या, अशा मागणी जरांगे पाटील यांनी केली. याबाबत काल (शुक्रवार) नवीन जीआर काढण्यात आला, मात्र या जीआर मध्ये दुरुस्ती झाली नसल्याने जरांगे यांनी त्यांचं उपोषण सुरुच ठेवलं. यानंतर आता कुणबी समाज आक्रमक झाला असून जरांगे पाटलांना तात्काळ अटक करण्याची मागणी कुणही सेनेकडून करण्यात आली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हा ओबीसींवर अन्याय

मराठा महासंघाच्या वतीने राज्यात हिंसक आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून रद्द केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही. ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल, अशी भूमिका कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी घेतली आहे.

जरांगे पाटलांना अटक करा...

मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांना उपोषणावरुन उठवावे. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांच्याजवळ कोणताही दस्तावेज नसताना वंशावळीची अट रद्द करण्याची त्यांची मागणी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे, असंही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे ही ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय करणारी कृती आहे. शासन मनोज जरांगे यांचं उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. पोलीस कारवाई करुन महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची विनंती केल्याचे कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायपालिकेचे रक्त सांडले, हा सुनियोजित डाव; CJI Suryakant यांचे धक्कादायक वक्तव्य, NCERT वाद पेटला! सरकारचे वकील स्तब्ध!

Luxury Car Fraud Case : माजी महापौरांचे 'मायाजाळ'! ३८ लाखांत ६८ लाखांची कार देण्याचं आमिष आणि घातला १४ लाखांचा गंडा; वाचा कोल्हेंनी मुंबईत कसा रचला होता सापळा?

Viral Video : बॉसने टेबलवर ठेवले नोटांचे ढीग, कर्मचाऱ्यांना म्हणाला- जितके नेता येतील तितके न्या; कंपनीच्या अनोख्या बोनसचा व्हिडिओ व्हायरल

March Bank Holiday : मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद! तुमच्या शहरात कधी राहणार सुट्टी; पाहा संपूर्ण यादी

मालिकेचं शूटिंग संपलं! आता निरोप घेतो.... अभिनेत्याने शेअर केले सेटवरचे शेवटचे फोटो; भावुक होत म्हणाला-

SCROLL FOR NEXT