Rahul Gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

'आरक्षणाची 50 टक्के मर्यादा काढून टाका'; राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा दाखला देत राहुल गांधींची मागणी

राजर्षी शाहू महाराज यांनी सरकारी नोकरीत समाजातील दुर्बल घटकांसाठी ५० टक्के आरक्षण देऊन या घटकांना बळ देण्याचे काम केले.

सकाळ डिजिटल टीम

राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडल्याने त्यांनी ‘संविधानात’ आरक्षणाचा समावेश केला.

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांनी २६ जुलै १९०२ रोजी समाजातील दुर्बल घटकांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; त्याचा दाखला देत लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षणाची पन्नास टक्के (Reservation 50 Percent) मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली.

या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करीत ही मागणी लावून धरली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान त्यांच्या काळाच्याही खूप पुढे होते. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते अग्रणी होते. सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावरही मोठा प्रभाव पडला आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी ‘करवीर संस्थानचे गॅझेट’ प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले. त्याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांनी सरकारी नोकरीत समाजातील दुर्बल घटकांसाठी ५० टक्के आरक्षण देऊन या घटकांना बळ देण्याचे काम केले.

राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडल्याने त्यांनी ‘संविधानात’ आरक्षणाचा समावेश केला. जातीय जनगणना करून आरक्षणातील ५० टक्के मर्यादा काढून टाकणे आणि उपेक्षितांसाठी न्याय, या आमच्या मागण्या राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT