Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics Crisis: सत्तासंघर्षाचा निकाल जानेवारीत लागता कामा नये; काय आहे पेच?

सकाळ डिजिटल टीम

पुणेः आमदारांची अपात्रता, निवडणूक चिन्ह आणि इतर कायदेशीर पेच; याबाबतची सुनावणी आता चार आठवडे पुढे ढकलली आहे. येत्या २९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होईल. परंतु ही सुनावणी जास्त लांबणे लोकशाहीसाठी घातक आहे, जानेवारी महिन्यात निकाल येता कामा नये, अशी भीती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलीय.

'सकाळ'शी बोलतांना डॉ. उल्हास बापट म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. भारताच्या सदृढ लोकशाहीसाठी हा निर्णय हा निर्णय गरजेचा आहे. राजकीय भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पक्षांतरबंदीचा कायदा बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला ठरवावे लागेल की, दोन तृतीयांश लोक बाहेर पडले, पण ते एकावेळी बाहेर पडले की एकेक गेले; यावर विचार होईल.

बापट पुढे म्हणाले की, जर आमदार एकाचवेळी बाहेर पडले, हे सिद्ध झाले तर १६ आमदार अपात्र ठरतील. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हेसुद्धा अपात्र ठरु शकतील. त्यानंतर त्यांना मंत्रीपदावरही राहता येणार नाही. आतापर्यंत जे मुद्दे तोंडी सांगितले आहेत ते आता लेखी स्वरुपात द्यावे लागतील. त्यानंतर पुढचे पंधरा दिवस कोर्ट विचार करेल. त्यानंतर निकाल येण्याची शक्यता आहे. ही हस्तक्षेप याचिका असल्यामुळे निकाल डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. असं कायदेतज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT