sambhajiraje esakal
महाराष्ट्र बातम्या

महापुरुषांच्या सन्मानासाठी कायदा करा; नियम मोडला की राज्याबाहेर हाकला, संभाजीराजेंची मागणी

संतोष कानडे

मुंबईः भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान होत आहे. यावरुन संभाजीराजेंनी भाजपची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्यांनी अशा लोकांना महाराष्ट्रबाहेर हाकलून देण्याची मागणी केलीय.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, प्रसाद लाड एकीकडे महाराजांना दैवत मानतो आणि दुसरीकडे महाराजांचा अभ्यास ठेवत नाही. भाजपने अशा लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. तरीही नाही ऐकलं तर यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकललं पाहिजे.

''राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्याची पहिली मागणी मी केलेली आहे. जोपर्यंत त्यांना राज्याबाहेर हाकललं जात नाही तोपर्यंत स्वराज्य संघटना लढणार आहे. एवढे सगळे लोक महाराजांबद्दल बोलत असतांना भाजप ठाम भूमिका का घेत नाही. यातून भाजपचा दुटप्पीपणा दिसून येतोय.''

पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, महापुरुषांबद्दल बोलतांना तारतम्य पाहिजे. यासाठी आता कायदा करायला हवा, जेणेकरुन कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं ते म्हणाले.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT