महाराष्ट्र बातम्या

राज्यात थंडीचा उतरला पारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातून सोमवारी थंडीने काढता पाय घेतला. राज्यात सर्वत्र किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. राज्यात नीचांकी तापमान जळगाव येथे (११.४ अंश सेल्सिअस) नोंदले असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी सुरू आहे. तसेच, उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. मात्र, उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे राज्यातील थंडी कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. 

उत्तरेतील वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली होती. पण, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने वाहत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तरेतील थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाला आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत अंशतः वाढ झाली. राज्यात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

पुण्यात किमान तापमान वाढले
शहरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हंगामातील नीचांकी म्हणजे ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवशी तापमान वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले. गेल्या ७२ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सिअसने वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज
मंगळवार ते गुरुवार ः आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. सकाळी तुरळक भागात धुके पडणार असून, किमान तापमान १४ ते १५ आणि कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT