3kanda_201_1_0.jpeg 
महाराष्ट्र बातम्या

कांदा निर्यातबंदी उठवा! 'फलोत्पादन'चे केंद्राला पत्र; शिल्लक कांद्यामुळे दर गडगडण्याची भिती 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील चाळींमध्ये मागच्या वर्षीचा तब्बल 13 लाख मे. टन कांदा पडून आहे. त्यातील बहूतांश कांदा आता खराब होऊ लागला आहे. दुसरीकडे फेब्रुवारी- मार्च 2021 पर्यंत राज्यात आणखी सव्वाशे लाख मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होईल. निर्यात बंदी न उठविल्यास बळीराजाचे नुकसान होईल, त्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे पत्र राज्याच्या फलोत्पादन विभागाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयास पाठविले आहे.

राज्यात जून- जुलैमध्ये 82 हजार हेक्‍टवर कांदा लागवड झाली आहे. तर लेट खरीपात 15 सप्टेंबरपर्यंत 23 हजार हेक्‍टरवर कांदा लागवड झाली आहे. तर नोव्हेंबर 2020 पर्यंत पाच लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होईल. दरम्यान, मागच्या वर्षीचा कांदा शिल्लक असून आगामी काळात राज्यात आणखी 120 लाख मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कांद्याचे दर खूपच कमी होतील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने व्यक्‍त केला आहे. बळीराजासमोरील अडचणीत पुन्हा वाढ होऊ शकते, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 21) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवांनी देशातील सर्वच फलोत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी यंदा राज्यातील कांद्याचे क्षेत्र 50 हजारांहून अधिक हेक्‍टर वाढणार असल्याचेही सांगण्यात आले.

शिल्लक कांदा अन्‌ आगामी अपेक्षित उत्पादनाची दिली माहिती 
राज्यात यंदा खरीप आणि लेट खरीप, उन्हाळी अशा हंगामात साडेसहा लाख हेक्‍टरपर्यंत कांदा लागवड होईल, असा अंदाज आहे. त्यातून 120 हून अधिक लाख मे. टन कांदा उत्पादित होणार आहे. दुसरीकडे गतवर्षीचा राज्यात 13 लाख मे. टन कांदा शिल्लक आहे, अशी माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे. शिल्लक कांद्यामुळे दर गडगडण्याची शक्‍यता आहे.
- शिरीष जमदाडे, संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र

फलोत्पादन विभागाची माहिती... 

  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीतून 17 हजार 338 हेक्‍टरवर फळबागांची लागवड 
  • रोजगार हमी योजनेतून विविध पिकांसाठी हेक्‍टरी 69 हजार ते अडीच लाखांपर्यंत मिळते मदत 
  • खरीप हंगामात राज्यातील 82 हजार हेक्‍टवर, तर लेट खरीपात 23 हजार हेक्‍टरवर झाली कांद्याची लागवड 
  • नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पाच लाख हेक्‍टरवर होईल उन्हाळी कांद्याची लागवड 
  • राज्यात आगामी काळात सव्वाशे मे. टनाहून अधिक कांदा उत्पादित होणार असल्याने दर कमीच राहतील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT