farmer
farmer 
महाराष्ट्र

कर्जमाफीचे वाढले अडीच लाख लाभार्थी

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - कुटुंबाऐवजी वैयक्‍तिक कर्जदार या निकषानुसार राज्यात दोन लाख ५७ हजार ३२८ कर्जदार वाढल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यातील दुष्काळ यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकरकमी परतफेड योजनेकडे (ओटीएस) पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंकांसमोरील अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसने काही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. तसेच सत्ता आल्यास अन्य राज्यांमध्येही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, असेही स्पष्ट केले. दुसरीकडे राज्यातील दुष्काळ, वेळेवर न मिळणारी एफआरपी, हमीभावाची प्रतीक्षा आणि कांद्याच्या दराचे वांदे, दुधाचे घसरलेले दर व अनुदानाची प्रतीक्षा यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे.

कुटुंबाऐवजी आता वैयक्‍तिक कर्जदाराला दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढणार असून, आतापर्यंत राज्यातील ४१ लाख लाभार्थ्यांना १७ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत. 
- संतोष पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, सहकार विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

SCROLL FOR NEXT