collcetor solapur
collcetor solapur 
महाराष्ट्र

बार्शी, मोहोळ, अक्कलकोटसह या गावांमध्ये लॉकडाऊन कायम 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन आज (रविवारी) पूर्ण होत आहे. सोलापूर शहराचा भाग वाढीव लॉकडाऊनमधून वगळण्यात आला आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या ठिकाणचा लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. त्यानुसार सुधारित लॉकडाऊनचा आदेश आज जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतला आहे. 

नवीन आदेशानूसार आता बार्शी शहर वैराग या भागातील लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढविला असून या कालावधीत जिवनावश्‍यक वस्तूसाठी सवलत दिलेली नाही. अक्कलकोट शहरासाठी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून फक्त 28 जुलै रोजीच सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेतर जीवनावश्‍यक वस्तू (उदा. किराणा दुकान, दूध, भाजीपाला) सुरु राहणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी कासेगाव परिसरात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून या भागाला कोणतीही सवलत नाही. कुंभारी, विडी घरकुल, वळसंग, मुळेगाव, मुळेगाव तांडा, होटगी, लिंबी चिंचोळी, बक्षी हिप्परगा, उळेगाव, तांदुळवाडी या भागात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन असणार असून या भागासाठी 27 व 28 जुलै रोजी जिवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहणार आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज, कोंडी व तिऱ्हे या गावांसाठी 31 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनन असून त्यांना कोणतीही सवलत नाही. मार्डी, पाकणी, बाणेगाव, तळे हिप्परगा, हगलूर, एकरुख, कारंबा, भोगाव या भागासाठी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून 27 व 28 जुलै रोजी जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतची सवलत देण्यात आली आहे. मोहोळ शहर, कामती खुर्द, कामती बुद्रुकचा लॉक डाऊन 31 जुलैपर्यंत असून 27 व 28 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी 7 पर्यंत जीवनावश्‍यक वस्तूसाठी सवलत देण्यात आली आहे. मोहोळ तालुक्‍यातील कुरूल मध्येही 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन असून या गावाकरिता कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT