BJP
BJP 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : विजयोत्सवाची तयारी सुरू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे.

प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक, भाजपचे प्रवक्‍ते अतुल शहा हे सीपी टॅंक येथे मुंबईत लाडू आणि केक कापून विजय साजरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) होणार आहे. त्या दिवशी प्रदेश भाजप कार्यालयात मोठे एलईडी लावण्यात येणार आहेत. त्यावरून विविध वाहिन्यांचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. तसेच, ढोलकी व अन्य वाद्ये वाजविण्यात येणार आहेत. फटाकेदेखील फोडण्यात येणार आहेत. सध्या ५०० किलो बुंदीचे लाडू बनविण्याचे सुरू आहे, असे शहा यांनी सांगितले. हा विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी कलाकारांनाही त्या दिवशी निमंत्रित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT