Loksabha-Election
Loksabha-Election 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : सात मतदारसंघांत १८४ उमेदवारी अर्ज

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (ता. २५) संपली असून, यासाठी तब्बल १८४ उमेदवारांचे अर्ज मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांत मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दहा जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सोलापूर, बीड, नांदेड मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी कालच अर्ज दाखल केले. दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी २९ मार्चपर्यंत मुदत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT