Politics 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019 : विदर्भात शेती, तर प. महाराष्ट्रात ‘गटबाजी’

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध शेतकऱ्यांना गटबाजीच्या राजकारणात अधिक रस असल्याचे दिसते.

विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू आहेत. सततच्या दुष्काळाने हा शेतकरी पिचला असून, तो कोरडवाहू शेतीच्या समस्यांवर सरकारने ठोस उपाययोजना केली नसल्याची खंत व्यक्‍त करीत आहे. याचे पडसाद मतदानात उमटतील, असे जाणकारांना वाटते. मात्र, या उलट शेतीचा सर्वाधिक विकास झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी मात्र गटातटाच्या राजकारणालाच प्राधान्य देत असल्याचे दिसते.  मराठवाडा व विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या कोरडवाहू पिकांचे उत्पादन व हमीभाव हे प्रचारात कळीचे मुद्दे ठरत आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा सर्वाधिक ऊस उत्पादक आहे. त्यामुळे सहकार, साखर कारखानदारी, दूध उत्पादक संस्था, पतसंस्था व शेतीपूरक उद्योग यांसारख्या आर्थिक क्षेत्रांत गुंतलेला आहे. या विभागातले राजकारणच ऊस उत्पादक व सहकारी संस्थाशी निगडित असल्याने इथे सत्तेचे पाठबळ महत्त्वाचे मानले जाते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांत बंडखोर नेत्यांची संख्या वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT