महाराष्ट्र बातम्या

दोन वर्षांत राज्यातील 39 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मागील वर्षीचा दुष्काळ तर या वर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील 39 लाख शेतकऱ्यांचे 27 लाख हेक्‍टरवरील पिकांचे 30 हजार 790 कोटींचे नुकसान झाले. सरकारच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार 100 कोटींची मदत मिळाली, तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होऊनही 501 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. 

दुष्काळ, नापिकी, पूर, अतिवृष्टी, अवकाळी या नैसर्गिक आपत्ती तर खासगी सावकार अन्‌ बॅंकांच्या कर्जाचा डोक्‍यावरील डोंगर आणि त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण व विवाहाची चिंता यातून मार्ग निघत नसल्याने मागील पाच वर्षांत राज्यात 15 हजार 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, नैसर्गिक आपत्तींमध्ये चारपट नुकसान होऊनही मदत एकपटच मिळाल्याने त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली. आता मूग, उडीद, सोयाबीनच्या खरेदीसाठी सरकारने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली. मात्र, आतापर्यंत 100 शेतकऱ्यांनीही ऑनलाइन नोंदणी केलेली नाही. पेरणी करूनही पाण्याअभावी पीक उगवले नाही, तर काही ठिकाणी पूर व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निकषांनुसार त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून सात हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. यंदा पूर व अतिवृष्टीमुळे 501 कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल सरकारला पाठविण्यात आला असून, केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. वास्तविक पाहता दुष्काळ, पूर व अतिवृष्टीमुळे चौपट नुकसान झाले असतानाही निकषांनुसार मदत दिली जात आहे. 
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी 

राज्यातील नुकसान 
वर्ष दुष्काळामुळे बाधित क्षेत्र प्रत्यक्ष नुकसान सरकारची मदत (रुपयांत) 
2018- 19 18.59 लाख हेक्‍टर 28,600 कोटी 7,100 कोटी 
2019- 20 9.43 लाख हेक्‍टर 2,190 कोटी 501 कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT