Devendra Fadnavis Uddhav-Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अख्ख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा, हे सरकार करतंय. मात्र, हा दावा फोल आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात किती मदत मिळाली? सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपस्थित केला. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती आहे, असंही फडणवीस म्हणाले. विधानसभा (Maharashtra Assembly Winter Session 2021) अधिवेशनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

'राज्य सरकारनं वीजमंडळाला पैसे दिले नाहीत' -

एखाद्या शेतकऱ्यानं वीजबील भरलं नाही, तर संपूर्ण डीपी काढून नेली जाते. गावच्या गाव अंधारात आहेत. हा विषय आम्ही विधानसभेत लावून धरला. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राज्य सरकार पैसे देत नाही, म्हणून वीज कनेक्शन कापण्यात आले, असं उत्तर दिलं. याबाबत उद्याही आम्ही आवाज उठवणार आहोत. सरकार सांगतं, थकबाकी वाढली. पण व्याजावर व्याज लावून थकबाकी सांगितली जाते. राज्य सरकार वीज मंडळाला एक रुपया द्यायला तयार नाही. सावकारासारखी शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि चक्रीवादळात ग्रसित झालेल्या लोकांच्या समस्या आम्ही लावून धरल्या आहेत. त्यांना दिलेलं पॅकेज हे फसवं आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.

'आमदारांवर विश्वास नसलेलं घाबरलेलं सरकार' -

अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रस्तावावरून हे सरकार किती असुरक्षित आहे, असं दिसतंय. गेल्या साठ वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीनं झाली. पण, १७० आमदार आमच्याकडे आहेत, असं सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकावर खुल्या पद्धतीनं निवडणूक घेण्याची नामुष्की आली आहे. या तीन पक्षाच्या सरकारमध्ये असंतोष आहे. त्यामुळे गुप्त पद्धतीनं निवडणूक घेतल्यास आमदार असंतोषामुळे फुटतील, असं त्यांना वाटलं. त्यामुळे नियम बदलण्याचा घाट घातला आहे, असं फडणवीस म्हणाले.

नियम समितीमध्ये बहुमत असताना देखील भाजपच्या सदस्यांना डावलण्यात आलं. आम्हाला निमंत्रण देण्यात आलं. काही आक्षेप आल्यानंतर नियम समितीनं पुन्हा निर्णय केला पाहिजे. मात्र, हे सर्व दुर्लक्षित करून दहा दिवसांची मुदत एक दिवसावर आणण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही पोल मागत होतो. पण, तो देखील आम्हाला दिला नाही. आता घोडेबाजार होईल म्हणतात. मग साठ वर्षात घोडेबाजार कधीच झाला नाही का? होय, यापूर्वी कधीच घोडेबाजार झाला नाही. पण, हे महाविकास आघाडी सरकार घाबरेलेलं आहे. आपल्या आमदारांवर विश्वास नसणारं हे सरकार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT