Maharashtra Bandh against NRC and CAA is Sucessful says Prakash Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

प्रकाश आंबेडकरांकडून बंद मागे; बंद यशस्वी झाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्रभर पुकारलेला बंद मागे घेतला असल्याचे सांगितले आहे. हा बंद यशस्वीही झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी बंद मागे घेत असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

आंबडेकर म्हणाले, 'आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही. घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्याने ती दगडफेक केलेली नाही. दगडफेक करणारा चेहरा झाकून आला होता. दगडफेक केल्यानंतर तो पळून गेला. चेहरा झाकून आंदोलनात उतरायचे नाही हे आम्ही आधीच कार्यकर्त्यांना सांगितले होते. बजरंग दल आणि भाजपाने या बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केला असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

तत्पूर्वी, सीएए आणि एनआरसीच्या विरोधासाठी आंबेडकर यांनी हा बंद पुकारला होता. वंचितसह ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला १०० संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एनआरसी आणि सीएए या कायद्याचा मुस्लिमांवरच नव्हे, तर हिंदुवरही परिणाम होणार आहे. हिंदुनाही नागरिकत्व सिद्ध करताना अडचणी येतील असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुंबईत दादरमध्ये कपडा बाजार आहे. जिथे दररोज काहीशे कोटींचा व्यवहार होतो पण आज ५० कोटींचा सुद्धा व्यवहार झालेला नाही असे सांगताना त्यांनी मुंबईतही बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT