Devendra Fadnavis with Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

maharashtra: राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा; धक्कादायक माहिती समोर

राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला असल्याची माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच तापलेला आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला असल्याचे एका अहवालातून समजते.(maharashtra karnataka border issue Devendra Fadnavis with Eknath Shinde 150 villages leave Maharashtra )

सीमावर्ती भागातील अनेक गावकऱ्यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या चार गावांतील नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्पुर्वी, सोलापुरातील काही गावांनीही महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा

सांगली जिल्ह्यातील जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, माडग्याळ, लकडेवाडी, अंकलगी, अंकलगी तांडा, निगडी बुद्रुक, उमदी, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बालगाव, बेळोंडगी, करजगी, बोर्गी, बोर्गी बुद्रुक, अक्कळवाडी, माणिनाळ, गुलगुंजनाळ, मोरबगी, भिवर्गी, कोंत्येवबोबलाद, करेवाडी, तिकोंडी, कागनरी, खंडनाळ, संख, दरीबडची, दरीबडची तांडा, मुचंडी, रावळगुंडवाडी, खोजानवाडी, उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड, साळमळगेवाडी, वज्रवाड, बिळूर, मेंढेगिरी, वळसंग, कोळगिरी, गुड्डापूर, आसंगी तुर्क, आसंगी बाजार, पांडोझरी, लवंगा, गिरगाव.

तसेच, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुकामधील १३ तर धर्माबाद तालुक्यातील १९ गावांनीही राज्य सरकारला इशारा दिला आहे. उमरी तालुक्यातील २ गावांचाही यामध्ये समावेश आहे.

यासोबतच, चंद्रपूर - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावे. सोलापूर - अक्कलकोट तालुका - २३ गावे. दक्षिण सोलापूर तालुका - १० गावे इतक्या गावांना महाराष्ट्र नकोसा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT