महाराष्ट्र बातम्या

कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले.

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय सरकारने घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावातील शेतकरी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी येथे आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील व  निलंगेकर यांचा सत्कार शेतकऱ्यांनी केला.

फडणवीस या वेळी म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक अशी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्याने गेली दोन ते तीन वर्ष सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. ‘आभाळच फाटलंय’ त्यातून खचून न जाता ते शिवण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला आहे. शेतकरी कर्जमुक्त झाल्यावर मी खऱ्या अर्थाने समाधानी होईल. सरकारमार्फत शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कृषी पंपांना सौरऊर्जा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. दोन दुष्काळांचा सामना करू शकेल एवढे पाणी या माध्यमातून मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT