महाराष्ट्र

भारनियमनावर लवकरच ऊर्जा विभागाची बैठक 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यात भारनियमनाने डोके वर काढलेले असताना आठवडाभराने का होईना; ऊर्जा विभाग लवकरच बैठक घेणार आहे. वीजनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी कोळसा टंचाईमुळे खासगी व महानिर्मितीच्या वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे कृषी ग्राहकांच्या रात्रीच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. रविवारी मात्र राज्यात कोणत्याही ग्राहक श्रेणीसाठी भारनियमन करण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

ऊर्जामंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी, महावितरण व महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदींच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. सध्याच्या कोळसा टंचाईच्या संकटावर उपाययोजना आणि अल्प मुदतीसाठी वीज खरेदीसारख्या विषयावर बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. राज्यातील कृषी ग्राहकांची विजेची मागणी आणि वाढत्या उकाड्यामुळे मागणीत होणारी वाढ यासाठी बैठकीत तयारीही अपेक्षित आहे. 

रविवारी सुट्टीचा दिवस असताना विजेची मागणी 13 हजार मेगावॉट होती. कार्यालयांना सुट्टी असल्याने विजेची मागणी हजार मेगावॉटने कमी झाली. आज अल्पमुदतीच्या करारातून 400 मेगावॉट वीज मिळाली. तर पॉवर एक्‍सचेंजमधूनही 150 मेगावॉट वीज मिळाली. एरव्ही, महागड्या विजेसाठी ओळखला जाणारा रतन इंडियाचा एक वीजसंच बंद पडला. तर अदाणीच्या एका संचातून उद्यापासून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. 

पवन ऊर्जा प्रकल्प मदतीला 
राज्यात पावसामुळे पवन ऊर्जा प्रकल्पातून 700 मेगावॉट वीज मिळाली. पवन ऊर्जा प्रकल्पांची स्थापित क्षमता 3,632 मेगावॉट आहे. कोळसा टंचाईमुळे औष्णिक विजेवर परिणाम झाला असला; तरीही पवन ऊर्जा प्रकल्पांनी मदतीचा हात दिला आहे. पावसाळ्यात विजेची मागणी कमी असताना पवन ऊर्जा महागडी म्हणून महावितरणने नाकारली होती; पण राज्यात भारनियमन सुरू असताना या प्रकल्पातूनच महावितरणला दिलासा मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT