महाराष्ट्र

वाद झाला नसल्याचा शिवसेना नेत्यांचा दावा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात फिरत होते. मात्र ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीतील वादाच्या बातम्या फुटल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे आमदार नीलम गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी संयुक्त पत्रक काढून वाद झालाच नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजप गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

‘मातोश्री’वर काल झालेल्या बैठकीत आमदार-खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी केली. मात्र काही आमदारांनी या मागणीला अप्रत्यक्ष विरोध केला. त्यात आमदार भरत गोगावले-पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि नीलम गोऱ्हे-श्रीरंग बारणे यांच्यात वादावादी झाली. बैठकीतील बातम्या माध्यमांपर्यंत पोचत असल्याने उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मोबाईल गाड्यांमध्ये ठेवून येण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही या बातम्या माध्यमांपर्यंत पोचल्यामुळे 

पक्षप्रमुख चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या प्रकारावरून सर्वांनच चांगलेच पुन्हा एकदा फैलावर घेतले आहे. ठाकरे संतापल्यामुळे नीलम गोऱ्हे आणि बारणे यांनी संयुक्त पत्रक काढून कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT