महाराष्ट्र

'वातावरण बदलाचे आव्हान स्वीकारा'

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याची जबाबदारी युवकांची आहेच; त्याचबरोबर नव्या युगापुढे उभे राहिलेल्या वातावरणातील बदलाचे आव्हान युवकांनी स्वीकारायला हवे. नव्या युगाच्या आव्हानांचा समावेश असलेला अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे, असे मत गुरुवारी (ता. ७) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

‘यिन’च्या कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना बदलत्या काळातील आव्हाने निंबाळकर यांनी उलगडून सांगितली. ते म्हणाले, की समाजात सर्व पातळीवर तणाव, विषमता वाढत आहे. त्यातून दरी निर्माण झाली आहे. ही दरी युवकच मिटवू शकतात. तुमच्या पूर्वीच्या पिढीने काय केले याचा विचार करीत बसू नका. तुम्ही काय करणार ते ठरवा. लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ती लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याचे आव्हान युवकांनी स्वीकारावे. वातावरणातील बदलाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पुढील ५० वर्षांत पर्यावरणात जे बदल होणे अपेक्षित होते, ते १०-१५ वर्षांतच होऊ लागले आहेत. पाणीसाठा मर्यादित आहे. मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी आव्हाने आहेत. त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारायला हवी. या आव्हानांचा सामना करण्याची सुरुवात स्वत:पासून करून त्याची चळवळ उभारावी, असे आवाहनही निंबाळकर यांनी युवकांना केले. लोकशाहीत संवाद महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून कायदा, धोरण तयार व्हायला हवे. नागरिकांच्या सहभागाने कायदा, धोरण झाल्यास त्याची १०० टक्के अंमलबजावणी होऊ शकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी यिनच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्‍नही विचारले. कोल्हापुरातील प्रेरणा शहा या युवतीने जात-धर्म नष्ट करण्यासाठी कायदा करता येईल का, असा प्रश्‍न विचारला. त्यावर निंबाळकर म्हणाले, की असा कायदा व्हावा हे माझे वैयक्तिक मत आहे; पण लोकसहभागातून कायदा अस्तित्वात यावा या मताचा मी आहे. सरकार कायदा करेल याची प्रतीक्षा करण्यापेक्षा नागरिकांनी आपल्या वागणुकीतून जात नष्ट केली तर हा प्रश्‍नच राहाणार नाही, मात्र हा प्रश्‍न विचारणे कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत निंबाळकर यांनी प्रेरणा शहा हिचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांच्या निमित्ताने निंबाळकर यांनी धार्मिक श्रद्धांवरही भाष्य केले. श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होऊ नये, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

‘क्‍लायमेट चेंज’ मंत्री
यिनच्या मंत्रिमंडळात नाशिकचे तेजस पाटील यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. या नव्या मुख्यमंत्र्यांवर रामराजे निंबाळकर यांनी ‘क्‍लायमेट चेंज’ खात्याची जबाबदारी सोपवली. वातावरण बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सूचनाही निंबाळकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT