Maharashtra political crisis cause the Raj Thackeray dispute between Eknath Shinde and Uddhav Thackeray
Maharashtra political crisis cause the Raj Thackeray dispute between Eknath Shinde and Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र

सत्तेसाठी १० वर्षांपूर्वीही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मदत केली होती

विश्वास पुरोहित

Eknath Shinde - Raj Thackeray MNS News

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आलंय. एकनाथ शिंदे गट मनसेसोबत जाणार, अशी चर्चा सुरू असून शिंदे- राज ठाकरेंमध्ये फोनद्वारे झाल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटलंय. मात्र, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची ही पहिली वेळ नसेल. १० वर्षांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले होते. विशेष म्हणजे या भेटीमुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. हा किस्सा नेमका काय होता, हे आपण जाणून घेऊया.

2012 मधील महापालिका निवडणुकीत १३०जागा असलेल्या ठाण्यात शिवसेनेला ५३जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भाजपाला ८ आणि आरपीआयला एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि आरपीआय अशी महायुती होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला ३४ आणि काँग्रेसला १८ जागांवर विजय मिळाला होता. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सात, बहुजन समाज पक्षाला दोन तर अपक्ष ७ नगरसेवक निवडून आले होते. युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे मनसे, बसपा आणि अपक्ष नगरसेवक किंगमेकर ठरणार होते. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो तर एकनाथ शिंदे या बालेकिल्ल्याचे किंग म्हणून ओळखले जातात. या बालेकिल्ल्यात शिंदेशाहीसमोर आव्हान निर्माण झाले होते.

निकाल समोर येताच एकनाथ शिंदे हे कामाला लागले. भाजपाची सत्ता आल्यापासून आमदारांचा हॉटेल मुक्काम चर्चेत असला तरी ठाणेकरांना लोकप्रतिनिधींचं ‘नॉट रिचेबल’ होणे हे एकनाथ शिंदेमुळे समजले. एकनाथ शिंदेंनी त्यावेळी ठाण्यातील बहुजन समाज पक्षाचे दोन नगरसेवक रातोरात अज्ञातस्थळी नेले. या नगरसेवकांचं अपहरण झाल्याची तक्रार जितेंद्र आव्हाडांनी करायला लावली होती. आता शिवसेनेसमोर मनसे आणि अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान होते. एकनाथ शिंदेंनी त्यावेळी थेट राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज गाठले. या भेटीनंतर राज ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि ठाण्याचा गड शिवसेनेने राखला.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे- राज ठाकरे भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. यात भर म्हणजे, कल्याण- डोंबिवलीतील एका खासगी कार्यक्रमात एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे तिघेही उपस्थित होते. यात एकनाथ शिंदे- राज ठाकरे समोरासमोर आले. दोघांमध्ये काही मिनिटांचा संवाद झाला. नेमके त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे- राज भेट पाहिली आणि नाराजीत भर पडली, अशी चर्चा त्यावेळी ठाण्यातील पत्रकारांमध्ये रंगली होती. गेल्या १० वर्षांत राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना- भाजपा यांची युती तुटलीये. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सत्तेवर आहे. पण उद्धव ठाकरे- ठाकरे यांच्यातील दुरावा कायम आहे.

बाळासाहेबांच्या इच्छेपायी पाठिंबा

ठाण्यातील शिवसेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे आणि प्रताप सरनाईक हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. राजकीय मतभेदांऐवजी जनहिताला प्राधान्य द्यावे, असे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय. त्यामुळे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतोय, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. यानंतर काही सभांमध्ये राज ठाकरेंनी या पाठिंब्याची आठवण करुन देत शिवसेनेवर बोचरी टीकादेखील केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT