shiv sena leader arvind sawant  esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'

बंडखोर आमदारांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, की जेव्हा बेरोजगारी आणि महागाई असताना, तर काही लोकांना केवळ सत्तेत येण्याची चिंता आहे. शिवसेना प्रमुखांशिवाय त्यांचे (बंडखोर आमदार) अस्तित्वच राहू शकत नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही, अशी घणाघाती टीका खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर केली. (Maharashtra Politics Arvind Sawant Says In State Unemployment, Inflation But Some Want Power)

मुंबईत (Mumbai) ते शनिवारी (ता.२५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले त्यातील (बंडखोर आमदार) काही जणांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना इतके दूर आसाममध्ये घेऊन जाण्यात आले आहे. अनेक आमदार आम्हाला सांगत आहेत, की त्यांना परत येण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. पक्षातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. पाच पैकी ही दोन महत्त्वाचे ठराव मानले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT