shiv sena leader arvind sawant  esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'

बंडखोर आमदारांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, की जेव्हा बेरोजगारी आणि महागाई असताना, तर काही लोकांना केवळ सत्तेत येण्याची चिंता आहे. शिवसेना प्रमुखांशिवाय त्यांचे (बंडखोर आमदार) अस्तित्वच राहू शकत नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही, अशी घणाघाती टीका खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर केली. (Maharashtra Politics Arvind Sawant Says In State Unemployment, Inflation But Some Want Power)

मुंबईत (Mumbai) ते शनिवारी (ता.२५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सावंत पुढे म्हणाले त्यातील (बंडखोर आमदार) काही जणांनी दबाव आणि भीतीतून बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना इतके दूर आसाममध्ये घेऊन जाण्यात आले आहे. अनेक आमदार आम्हाला सांगत आहेत, की त्यांना परत येण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. या प्रसंगी पाच ठराव संमत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. पक्षातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. पाच पैकी ही दोन महत्त्वाचे ठराव मानले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT