Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: नवं नाव-चिन्ह मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब हे नाव..

महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पोटनिवडणुकीआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली आहेत. ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' अशी नावं दिली आहेत. यामध्ये ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे मात्र शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालेली नाहीत. त्यावर दोन्हा गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या निर्णयावर बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावर आदित्या ठाकरे म्हणाले "मिळालेलं नाव आम्ही घरोघरी जनतेत घेवून जावू, मिळालेल्या नावात संपूर्ण शिवसेना परिवार आहे. आधी जस घरोघरी जावून काम करत होतो, तसच काम आता पण करणार आहोत. आयोगाने दिलेलं चिन्ह आम्ही देशभर घेवून जावू. आणि या पोटनिवडणूकीत (Andheri Bypoll Election) मोठ्या मताने आमचा विजय होणार आहे. आणि शिंदे गटाला मिळाल्या नावावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले बाळासाहेब हे नाव खऱ्या शिवसेनेला मिळाले आहे.

किती काही झालं तरी ही महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. कारण जे काम केलं आहे ते लोकांसमोर आहे, आणि आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत. पुढे म्हणाले राज्यात घटनाबाह्य सरकार स्थापन झालं आहे. तरी देखील ते वेगवेगळी राजकीय कामे करत आहेत त्यामध्ये फक्त कोणता पक्ष कुठे आहे यावर त्यांच लक्ष आहे." असं मत आदित्या ठाकरे यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT