Raj Thackeray
Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र

सर्व ठाकरेंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ; बाळासाहेबांच्या नातवाने व्यक्त केली इच्छा

सकाळ डिजिटल टीम

बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात सध्याची परिस्थिती बघता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे अशी चर्चा पुन्हा एकाद रंगू लागली आहे. या सर्वामध्ये बाळासाहेबांचा नातू जयदीप ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान करत एका इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.

राज्यातील सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत ठाकरे परिवारातील इतर ठाकरे सदस्यांनी एकत्र आलं पाहिजे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनी इतर ठाकरेंनी एकत्र आलंच पाहिजे असे विधान केले आहे. नुकतेच जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे अनेक अर्थ लावले जात होते.

त्यानंतर आता जयदीप ठाकरेंनी इतर ठाकरे सदस्यांनी एकत्र आलेच पाहिजे असे विधान केले आहे. यावेळी त्यांनी नवं चिन्हं आणि नावाबाबत शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शिंदे गटाला जरी बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं असलं, तरी रक्त आमच्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT