Vinod-Tawde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज्यातल्या घडामोडींच्या मागे विनोद तावडे? स्वतः ट्वीट करत हात काढून घेतला

महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूत झाली आहे, असंही तावडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या घडामोडींमागे भाजपाचं ऑपरेशन लोटस आणि त्यासाठी काम करणारे विनोद तावडेंचा हात असल्याचं बोललं जात आहे. त्याबद्दल त्यांनीच आता स्पष्टीकरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या ऑपरेशन लोटसबद्दलचा अहवाल विनोद तावडे यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे दिल्याचं बोललं जात आहे. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. याबद्दल आता विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये विनोद तावडे म्हणाले, "दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे."

भाजपाने राज्यात ऑपरेशन लोटस सुरू केलं असल्याचं सांगितलं जात आहे. २०२४ च्या निवडणुकीतलं नुकसान टाळण्यासाठी हे सुरू केलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याच्या चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT