Uday Samant  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : "...जी पातळी गाठतोय ते योग्य नाही"; उदय सामंतांनी टोचले 'काही' नेत्यांचे कान

विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहोचले आहेत. अशातच उदय सामंत यांनी ही विनंती केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या नेत्यांनी टीका करताना पातळी सोडून टीका करू नये, असं सांगत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर विविध पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहोचले आहेत. अशातच उदय सामंत यांनी ट्वीट करत हे आवाहन केलं आहे.

काय म्हणतात उदय सामंत?

आपल्या ट्वीटमध्ये उदय सामंत म्हणतात, "महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते. परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टीकाटिप्पण्यांना उत आला आहे. दसरा मेळाव्यापासूनच या सगळ्याला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधले नेते सातत्याने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. भास्कर जाधव आणि राणे बंधू यांच्यातला संघर्ष सध्या ताजा आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT