Maharashtra Rain Updates 6th August IMD Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईला यलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट; राज्यातील इतर जिल्ह्यांत काय परिस्थिती?

Mumbai Weather: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि मध्य-पश्‍चिम महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

आशुतोष मसगौंडे

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 5 ऑगस्ट रोजी मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानंतर, IMD ने आज शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी मुंबईत ऑरेंज अलर्ट होता.

दुसरीकडे, पुणे आणि सातारा सध्या ऑरेंज अलर्टच्या झोनमध्ये आहेत, घाटांच्या भागात मुसळधार पावसाची आणि मैदानी भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

IMD ने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये 40 किमी/ताशी वेगाने विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, IMD ने 6 ऑगस्टपर्यंत पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कोकण आणि मध्य-पश्‍चिम महाराष्ट्रातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. राज्यातील बहुतांश धरणे भरत आली आहेत. त्यामुळे कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांतील विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या महिन्याभरात कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे.

घाटमाथ्यावर काही काळ पावसाचा जोर मंदावत असला तरी पुन्हा जोरदार सरी कोसळत आहेत. नगरमधील अकोले तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्याने भंडारदरा धरण भरले. त्यातून निळवंडे धरणात विसर्ग सोडण्यात आला आहे.

दुसरीकडे गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असून, तुरळक ठिकाणी पावसाचा सडा पडत आहे. तर विदर्भाच्या पूर्व भागात हलक्या सरी आहेत. बुलडाण्यातील नरवेल, चांदूरबिस्वा मंडलात मध्यम पाऊस झाला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने या भागातील नद्या अजूनही भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांतील पाणी पातळी वाढत आहे. तर इटियाडोह, कामठी खैरी ही धरणे शंभर टक्के भरली असून सिरपूर ८० टक्के, तोतलाडोह ८७ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT