मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 49 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 1,39,411 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,397 इतकी आहे.
आज 2681 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,70,472 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 2413 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,94,075 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.
नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7,नाशिक 17,पुणे 14,कोल्हापूर 3,लातूर 5, लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,39,587 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,328 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.