Maharashtra Crops Sakal
महाराष्ट्र बातम्या

पाऊस पडूनही बळिराजा दुःखातच! आठ लाख हेक्टरातली पिकं पाण्यात

पाऊस कायम राहिला तर याहूनही अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

मान्सूनमुळे यंदा बळिराजाला मोठा फटका बसला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातली आठ लाख हेक्टरमधली उभी पिकं मातीमोल झाली आहे. हे नुकसान केवळ काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर आगामी काळात आणखी जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातली तब्बल आठ लाख हेक्टरातली पिकं अक्षरशः पाण्यात गेली आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात तर पडला. मात्र पेरणीनंतर आलेला धुवाँधार पाऊस आणि पुरामुळे पिकं अक्षरशः पाण्यात गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

माहेरी एकुलती एक लेक पण सासरी खटल्याचं घर! अजूनही २ अविवाहित नणंदांसोबत संसार करतायत ऐश्वर्या नारकर

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

Shiv Sena Symbol Case : 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल'; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादावर संजय निरुपम यांचा मोठा दावा, शिंदेंच्या बंडाबाबतही केलं भाष्य

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT