Maharashtra Crops Sakal
महाराष्ट्र बातम्या

पाऊस पडूनही बळिराजा दुःखातच! आठ लाख हेक्टरातली पिकं पाण्यात

पाऊस कायम राहिला तर याहूनही अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

मान्सूनमुळे यंदा बळिराजाला मोठा फटका बसला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातली आठ लाख हेक्टरमधली उभी पिकं मातीमोल झाली आहे. हे नुकसान केवळ काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर आगामी काळात आणखी जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातली तब्बल आठ लाख हेक्टरातली पिकं अक्षरशः पाण्यात गेली आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात तर पडला. मात्र पेरणीनंतर आलेला धुवाँधार पाऊस आणि पुरामुळे पिकं अक्षरशः पाण्यात गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT