Jayant-Patil 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : राज्यात मोदी, शहांच्या एवढ्या सभा कशासाठी? - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - राज्यात मला समोर विरोधक दिसत नाहीत, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या एवढ्या सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, राज्यात मला पहिलवान विरोधक दिसत नाहीत, असे असेल तर त्यांनी घरी बसूनच निवडणुका जिंकल्या पाहिजेत. महाराष्ट्रात विरोधकच नाहीत  तर मोदी आणि शहा यांच्या या सभांची आवश्‍यकता काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हे घाबरलेले आहेत. त्यांनी शरद पवार यांची धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे नेते अमित शहा हे राज्यात शरद पवार यांच्यावरच आरोप करीत आहेत.’’

विरोधकांची ताकद दिसून येईल
राज्यात विरोधकच नाहीत, म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी नेत्यांच्या मागे ‘इडी’, ‘प्राप्तिकर’ विभाग लावून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आता हे कळले आहे, असे  पाटील या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT