निमगाव केतकी (ता. इंदापूर) - हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी. 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार - स्मृती इराणी

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : निमगाव केतकी  - राज्याला विकासाचा दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व मिळाले आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याने इंदापुरातून भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय महिला, बालकल्याण विकास आणि वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

इंदापूरचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ निमगाव केतकी येथे झालेल्या सभेत सोमवारी त्या बोलत होत्या. या वेळी उमेदवार पाटील, पद्माताई भोसले, पृथ्वीराज जाचक, अशोक घागरे, बाळासाहेब घोलप, लालासाहेब पवार, देवराज जाधव, कृष्णाजी यादव, छाया मिसाळ, नानासाहेब शेंडे, वसंत मोहळकर,  मच्छिंद्र चांदणे, सारिका काळे उपस्थित होते. 

इराणी म्हणाल्या, ‘‘राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने २४ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. या पाच वर्षांत राज्यातील साठ हजार शाळा डिजिटल केल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर १५ हजार कोटी खर्च केले. राज्यात पुन्हा हेच सरकार येणार आहे. त्यामुळे तुम्ही पाटील यांना निवडून द्यावे.’’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘पाच वर्षे निष्क्रिय आमदारामुळे तालुक्‍याला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आमचे हक्काचे पाणी पुन्हा आम्हाला मिळावे, ही आमची मुख्य मागणी आहे. सत्ता युतीचीच येणार असल्याने जनतेने मला विजयी करावे.’’ या वेळी इतरांचीही भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT