मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर मागच्या चार दिवसांपासून राज्याला परतीच्या पावसामुळे झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. सोयाबीनसहित खरिपाच्या कापूस पिकाचेही पाण्यामुळे नुकसान झाले असून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
(Opposition Leader Ajit Pawar Latest News)
"राज्यात अतिवृष्टीमुळे खरिपासहित रब्बीच्या पिकाचं पाण्यामुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा" अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकाची पाहणी करून युद्धपातळीवर पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल" असं सांगितल.
सोयबीन पाण्यात, कापसाच्या वाती
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे. सोयाबीनचे सगळे शेतं पाण्याखाली गेले असून कापसाच्या वाती झाल्या आहेत. तर काही कापसाच्या बोंडातून अंकुर बाहेर येऊ लागले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना हा फटका बसल्यामुळे यावर्षीची शेतकऱ्याची "दिवाळी कडू" होणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर भाव गडगडले
पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनला आणि कापसाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली दाखली जात असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल विकावा लागतोय. त्याचबरोबर कापसाला प्रतिकिलो १० रूपये भाव मिळाल्याचा प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाला होता. तर सोयाबीनला भाव मिळण्यासाठी शेतकरी प्रतिक्षेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.