Mahatma Gandhi Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahatma Gandhi यांना ब्रिटीश सरकार १०० रुपये पेन्शन द्यायचे; भाजपा नेत्याचा दावा

महात्मा गांधीजींची तुलना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपा नेते अवधूत वाघ यांनी एक मोठा दावा केला आहे. महात्मा गांधींना ब्रिटीश सरकार दरमहा पेन्शन द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. अवधूत वाघ यांनी गांधीजींची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी केली आहे. त्यांनी याविषयीचं ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये अवधूत वाघ म्हणतात, आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना देखील ब्रिटिश सरकार दरमहा 100 रुपये द्यायची. त्यावेळी सोने 18 रुपये तोळा होते. म्हणजे तत्कालीन 100 रुपये आजच्या 275000 रुपया समान होते. पण मी याला पेंशन म्हणणार नाही. सावरकरांच्या 60 रुपयांच्या मानाने 66% जास्त रक्कम आहे ही.

यापूर्वीही अनेकदा अवधूत वाघ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे या आधीही चर्चेत आले होते. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हणून संबोधलं होतं. त्यावरुनही त्यांना जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT