Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: एक महिन्याचा वेळ कशाला हवा? ४ दिवसांचा वेळ पुरेसा; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Sandip Kapde

Maratha Reservation:  मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहेत. अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हापासून या आंदोलनाला वेग आला. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली गावात दाखल झाले आहे. सरकारने मनोज जरांगे यांना एक महिन्याचा वेळ मागितला आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या मनधरनीचे प्रयत्न केले. आंदोलन एवढं ताणून चालत नाही, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहेय एक महिन्याचा वेळ द्यावा, असे गिरिश महाजन म्हणाले.

यावर एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी गिरिश महाजन यांना केला. आधीही वेळ दिला आता गरज नसताना वेळ मागत आहात, असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "तुम्ही म्हणाल ते करतो आधी अध्यादेश काढा. आम्ही ओबीसीमध्ये आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहली. ४ फेब्रुरवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. अजून ४ दिवस सरकारला देतो." (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT