Vidhan Bhavan 
महाराष्ट्र बातम्या

शेतकरीप्रश्नी विरोधक वेलमध्ये; विधानसभा दोनवेळा तहकूब

ब्रह्मा चट्टे

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाची आज (बुधवार) सुरवात होताच कालपासून अाक्रमक असलेल्या विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरवात केली. शेतकरी कर्जमाफी आणि बोंडआळी संबंधी सरकारविरोधी घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा सुरू करण्यात आली. मात्र, कोणाच्या प्रस्तावावर चर्चा करायची याबाबत दुमत झाल्याने पुन्हा गोंधळ करत विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभा दहा मिनिटांसाठी व पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. 

आज अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नियम 57 अन्वये आणि 97 अन्वये बोलायला उभे राहिले. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सतत्याने चर्चेला मुद्दा आहे. बोंडआळी आणि गारपीठाने झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून कोणतीही हलचाल होत नाही. याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यामुळे याप्रश्नावर आम्ही प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे बाजूला ठेवून चर्चा करावी."

विरोधकांच्या या मागणी नकारत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चर्चेला नकार दिल्याने विरोधक अाक्रमक झाले. शेतकरी कर्जमाफी आणि बोंडआळी संबंधी सरकारविरोधी घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. ' झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, नही चलेंगी वही चलेगी दादागिरी नही चलेगी, सेना भाजप सरकारचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय हाय, शिवसेना सरकार हाय हाय, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. यावेळी प्रश्नोत्तरे सुरूच होता. विरोधक मात्र गोंधळ घालतच होते.

त्यावेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आपण राज्य शासनाचा 23 फेब्रुवारीचा जीआर पहा. राज्य सरकारने काय आश्वासन दिले होते ते बघा. त्या जीआरवर विधानसभेत चर्चा करावी अशी आमची मागणी आहे." 

त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, "प्रश्नोत्तराचा तास थांबवून चर्चा सुरू करायचा असेल तर सुरू करा, " विरोधकांचा गोंधळ वाढल्याने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चेला सुरवात करण्यात आली.

भाजप आमदार अनिल बोंडे यांनी नियम 293 अन्वये बोंडआळी व गारपीठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्तावाचे वाचन सुरू केले. मात्र नियम 57 अन्वये आम्ही दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करा. राज्य सरकारच्या जीआरवर चर्चा करा अशी मागणी विरोधकांनी केली. कोणाच्या प्रस्तावावर चर्चा करायची याबाबत दुमत झाल्याने पुन्हा गोंधळ करत विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. विरोधक आक्रमक असल्याने दुसऱ्यांदा कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT