Jitendra Awhad 
महाराष्ट्र बातम्या

'मावळचा गोळीबार गरजेचा होता हे न्यायाधीशांनी मान्य केलंय'

जितेंद्र आव्हाडांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं उत्तर

दीनानाथ परब

मुंबई: लखीमपूर खेरी (Lakhimpur kheri) येथे शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद (Maharashtra bandh) पुकारण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. "अमानवीय कृत्याचं दु:ख होणं हे माणसुकीच दर्शन आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज हा त्या घटनेतून दिसतो. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभा आहे आणि मागून येऊन जीप त्यांच्या अंगावर घालायची आणि नऊ जणांना चिरडून मारुन टाकायचं. त्याबद्दल वाईट वाटणार नसेल, तर तशी महाराष्ट्राती संस्कृती नाही" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

"शेतकरी कुठलाही असो, शेवटी ते देशाचा शेतकरी आहे. देशासाठी अन्न पिकवतो. उत्तर प्रदेशात ज्या भागात हे घडलं, तिथे सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन होतं. शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर होणार दु:ख दाखवायचं की नाही. तुमच्यालेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच यातून दिसते" अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी विरोधकांवर केली. "ज्यांना चिरडून मारलं, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली असती, तर माणसुकी दिसली असती, जिवंतपणा दिसला असता" असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विद्यमान सत्ताधारी लखीमपूर खेरीचा मुद्दा उपस्थित करत असताना, देवेंद्र फडणवीसांनी मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली. शेतकऱ्यांसोबत झालेली ही घटना खऱ्या अर्थाने जालियनवाला बाग हत्याकांड आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. "मावळमध्ये घटना घडली त्याची चौकशी झाली आहे. चौकशीत गोळीबार कसा गरजेचा होता ते न्यायाधीशांनी मान्य केलं आहे. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला. पोलिसांच्या हातातून बंदुका खेचून नेत्यांच्या मुलांनी गोळीबार केलेला नाही" असे आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मोदी-शहा लोकसभेत आले, कामकाज सुरू होताच अनिश्चित काळासाठी स्थगित

Solapur Crime: ‘मुलाला जन्म देऊ शकत नाहीस, माहेरहून ४० लाख घेऊन ये’; विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा

World Organ Donation Day 2026: कॅन्सर झाला असेल तर अवयवदान करता येतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

World Organ Donation Day: किडनी प्रत्यारोपणातील तफावत; एका अवयवदानाने कसे बदलू शकते आयुष्य...

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT