महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा पाठिंबा नसला तरीदेखील नवं सरकार टिकणार?

वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात भाजपने अखेर अजित पवार यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप-अजित पवार यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय आता याप्रकरणी उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थिर ठेवण्याचा भाजपचा प्लॅन तयार असून, त्यानुसार आता रणनीती आखली जाणार आहे.

भाजपने महाराष्ट्रात अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. मात्र, त्यांच्या या सरकार स्थापनेवरून राष्ट्रवादीसह शिवसेना-काँग्रेसने विरोध करत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. यामध्ये या तिन्ही पक्षांनी भाजपला बहुमत सादर करण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर आज साडेअकराच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने यावर आपला निर्णय दिला नाही. आता उद्या यावर निर्णय देण्यात येणार आहे.

अशी होईल आकड्यांची जुळवाजुळव

भाजपकडे 105 आमदार तर 13 अपक्ष आमदार आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थनार्थ 19 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेचे नवं समीकरण येऊन 105+13+19=137 संख्या होणार आहे. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवार यांचा सरकार स्थापनेचा 'प्लॅन बी' तयार आहे. 

8 आमदारांची गरज

भाजप-अजित पवार यांच्याकडे आता 137 आमदारांचे पाठबळ असल्याचे समोर येत असले तरीदेखील त्यांना सरकार स्थापनेसाठी आणखी 8 आमदारांची गरज भासणार आहे. त्यानुसार आता भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT