Shivendraraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

Uniform Civil Code : समान नागरी कायद्यावरून शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, "घेतला हा निर्णय.."

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले आहेत.'

सातारा : आपण ज्या राजघराण्यात जन्मलो आहोत, त्या घराण्यातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजेंच्या वक्तव्यावर केली.

प्रतापगडावर शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमास खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) उपस्थित राहिले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून उशिरा निमंत्रण मिळाल्याचं सांगत पालकमंत्र्यांसह इतर कोणाचाही आपल्याला फोन आला नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर टीका केली.

शिवेंद्रसिंहराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देत मला जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण आले होते. आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे, त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते? प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

समान नागरी कायद्याबाबत (Uniform Civil Code) भूमिका मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले. यामध्ये काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याची अनेक वर्षांचीही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असे मलाही वाटतंय. त्यामुळं याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.’’

मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. त्यांनी जे विधान केलंय ते कोणाशी तुलना करून केलेलं नाही. आता अलीकडच्या काळात कुठलेही वक्तव्य केले की भावना भडकण्याचा प्रयत्न होतोय. पण, काल त्यांच्या विधानातून असं काही दिसून येत नाही.’’ राज्यपालांच्या भूमिकेबाबत तुम्ही आक्रमक दिसत नाही, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘भडक बोलणे म्हणजे आक्रमकता नव्हे.’ राज्यपाल बदलाचा निर्णय हा महाराष्ट्रातून होत नाही तर, तो केंद्राकडे आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस हे सर्वांच्या भावना योग्य पोचवण्याचे काम करतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT