Raj Thackeray
Raj Thackeray 
महाराष्ट्र

काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचे लचके तोडले जातील : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काश्‍मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही उद्या लचके तोडले जातील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

"मनसे'च्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. राज म्हणाले की, आज काश्‍मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर ते बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरते नसून इतर राज्यांसाठीही लागू आहे. उद्या महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही, तर मराठी म्हणून फिरेल, असा इशारा राज यांनी दिला. या वेळी त्यांच्या टीकेचा रोख हा केंद्र, राज्य सरकार आणि भाजप समर्थकांच्या दिशेने होता. 

लोकसभा निवडणुकीत 371 मतदारसंघांत घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली. 370 वे कलम रद्द केल्याने पेढे वाटले जात आहेत, पण 371 मतदारसंघांत घोळ झाला त्यावर कोणी बोलत नाही, असे ते म्हणाले. 

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे, असा संताप व्यक्त केला. कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार, हे सांगताना राज यांनी गौप्यस्फोट केला की, "भाजपमधील एक वरिष्ठ व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे ईव्हीएम मशिन्स नाहीत. हे कोण आणि कधी बोलले ते बाळा नांदगावकर यांना माहिती आहे.'' 

ज्येष्ठांना प्लॅन करून पाडले 
चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गिते आणि शिवाजीराव आढळराव पाटील या शिवसेनेच्या चार ज्येष्ठ खासदारांना प्लॅन करून पाडण्यात आले, असा आरोप राज यांनी केला. भाजप आणि शिवसेनेने ईव्हीएमच्या मदतीने हे घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिम आणि हिंदूंमध्ये कायम तणाव राहावा म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना निवडून आणण्यात आले. त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला. अमरावतीत अडसूळ यांच्याऐवजी नवनीत राणा, शिरूरमध्ये आढळरावांच्या ठिकाणी अमोल कोल्हे निवडून आले. हे सारे ईव्हीएमच्या करामतीमुळे घडले. या चार ज्येष्ठ खासदारांना मंत्री करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचा पराभव घडवून आणण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT