raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri violence) येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले. मात्र, केंद्र सरकारने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. व्यापाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मनसे (MNS supprt traders) पुढे सरसावली आहे.

शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निषेधार्थ आहे. पण बंद पुकारून जनतेचे नुकसान होत असून गेल्या दीड वर्षांत जनता पिचली जात आहेत. आता दीड वर्षानंतर सर्व खुलं होत असताना हा बंद सरकारकडून पुकारणे हाच एक निषेध आहे, असे मनसेचं म्हणणे आहे. पोलिस प्रशासन बंदसाठी सरकारच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा मनसेचा आरोप आहे. व्यापाऱ्यांना दुकाने उघडायची असल्यास मनसे संरक्षण देणार, असेही मनसेकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये दोन गाड्या घुसविण्यात आल्या. यामध्ये ४ शेतकरी चिरडून ठार झाले. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याला अद्यापही अटक करण्यात आली नव्हती. वाढत चाललेला दबाव बघता अखेर त्याला रविवारी अटक करण्यात आली. पण, यामध्ये केंद्र सरकारने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT