raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri violence) येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले. मात्र, केंद्र सरकारने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. व्यापाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मनसे (MNS supprt traders) पुढे सरसावली आहे.

शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निषेधार्थ आहे. पण बंद पुकारून जनतेचे नुकसान होत असून गेल्या दीड वर्षांत जनता पिचली जात आहेत. आता दीड वर्षानंतर सर्व खुलं होत असताना हा बंद सरकारकडून पुकारणे हाच एक निषेध आहे, असे मनसेचं म्हणणे आहे. पोलिस प्रशासन बंदसाठी सरकारच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा मनसेचा आरोप आहे. व्यापाऱ्यांना दुकाने उघडायची असल्यास मनसे संरक्षण देणार, असेही मनसेकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये दोन गाड्या घुसविण्यात आल्या. यामध्ये ४ शेतकरी चिरडून ठार झाले. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याला अद्यापही अटक करण्यात आली नव्हती. वाढत चाललेला दबाव बघता अखेर त्याला रविवारी अटक करण्यात आली. पण, यामध्ये केंद्र सरकारने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT