Winter Session 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2024 : अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यातही येणार पेपरफुटीचा कायदा; आश्वासन देत फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis : ''तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जातोय, आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे, याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल'

संतोष कानडे

मुंबईः राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यामध्ये पेपरफुटीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्यावरुन सभागृहात विरोधकांनी आवाज उठवला. शिवाय परीक्षेसाठी लागणारी मोठी फीस, नॉर्मलायझेशन यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.

पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचा पेपर फुटीचा कायदा आणणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात केली. सुरुवातीला मुद्दा मांडताना रोहित पवार म्हणाले की, पेपर फुटीबाबत सरकार कायदा करणार आहे का? केंद्राचा‌ कायदा आला त्यांचं कौतुक आहे, तसा कायदा इथंही आणावा लागेल.

रोहित पवारांना उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जातोय, आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे, याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल, असं फडणवीस म्हणाले.

पदभरतीच्या संदर्भातने बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आपण म्हणता पेपरफुटी पूर्वीच्या सरकारच्या काळात झाली, पण २०२२-२३ मध्ये अनेक भरतींचा पेपर फुटला, मग त्याला जबाबदार कोण? पेपरफुटी ही कीड आहे ती थांबवली पाहिजे.

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं, भास्कर जाधव फेक नरेटिव्ह दाखवत आहेत. युवांमध्ये असंतोष कसा होईल यासाठी फेक नरेटिव्ह केलं जात आहे, पुण्यात एक वेबसाईट आहे ती हे पसरवण्याचं काम करते आहे. ती आता एका व्यक्तीनं टेकओव्हर केली आहे, मी गृहमंत्री आहे, सर्व गोष्टी माहिती असतात. शांत स्वभाव आहे म्हणून बोलत नाही असं नाही असं फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

  • तुम्ही म्हणता भरती झाली पण अजून जवळपास अडीच लाख पदं रिक्त आहेत

  • सरकारमध्ये अजून ३३ टक्के पदे रिक्त आहेत

  • गृहविभागात ५७ हजार पदे रिक्त आहेत

देशमुखांना फडणवीसांचं उत्तर

  • पदभरती तुम्हीच रोखली होती, २००५ नंतर भरतीवर रोख आली होती

  • मी मुख्यमंत्री असताना भरती सुरु केली, आपण अजून पदं भरणार आहोत

  • २ वर्षात आम्ही १ लाख पदे भरली आहेत. तुम्ही नोकरभरती बंद केली पण आम्ही सुरू केली.

  • जेवढे मागे जावू तेवढे तुम्ही उघडे पडाल. आम्ही पदे भरणार, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT