महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू  sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

राज्यात वन्यजीव हल्ल्यात ५५ जण ठार; बिबट्याच्या हल्ल्यात दहा जणांचे गेले जीव

राजेश रामपूरकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मागील आठ महिन्यात राज्यात ५५ जण मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहेत. त्यात सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १५ टक्के अधिक आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ होत असताना त्याचा अधिवास कमी झालेला आहे. वन विभागाने संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, विकासकामे, रस्त्याचे रुंदीकरण आणि वाघाचा अधिवास शोधण्यासाठी होणारी भटकंती. यामुळेही वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. त्यामुळेही वाढलेली वन्यजीवांची संख्या आता वन विभागासाठी डोकेदुखी ठरु लागले आहे.

गेल्या आठ महिन्यात मनुष्यावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले आहेत. दोन वाघांना जेरबंद करण्यात यशही आलेले आहेत. आता गडचिरोली जिल्ह्यातील मनुष्यावर हल्ला केलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने आदेश दिलेले आहेत. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करीत आहेत. अद्यापही त्याला यश आलेले नसले तरी कर्मचारी दिवस-रात्र त्या वाघाचा मागोवा घेत आहे. आता पुन्हा मनुष्य हानी होऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहेत.

गेल्यावर्षी राज्यात नऊ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५३ जणांनी जीव गमावले होते. यंदा आठ महिन्यातच ५५ जणांचे जीव गेल्याची उघडकीस आले आहे. वाघामुळे ४१, बिबट्याने १०, जंगली डुकरांमुळे तीन आणि एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ मृत्यू विदर्भात आहेत. देशात सर्वाधिक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू राज्यातच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात गेल्या आठ महिन्यात ५५ जणांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले आहेत. त्यात सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्‍यातील आहेत.

-युवराज, मुख्य वनसंरक्षक

वर्ष - मृत्यू - नुकसान भरपाई

२०२१ - ५५ - ५.२५ कोटी

२०२०- ८८ - १८.७५ कोटी

२०१९ - ३२ - ५.८५ कोटी

२०१८ - ३६ - ३.१२ कोटी

२०१७ - ५०- ४.३२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT