farmer 
महाराष्ट्र बातम्या

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - राज्यातील शेतकरी दुष्काळासोबतच अतिवृष्टी व महापुराने हैराण आहेत. अनेक वर्षांपासून नापिकीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे नाशिकला धरणे आंदोलन करण्यात आले. 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, देवीदास पवार, शंकर पूरकर, संतू पाटील झांबरे, भगवान बोराडे, त्र्यंबक गांगुर्डे आदींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. दुष्काळ, महापुराने हैराण असल्याने घरखर्च चालविणेही अवघड झालेल्या शेतकऱ्यांना कर्जफेड अवघड झाली आहे. पिकणाऱ्या पिकाला भाव नाही. दुसरीकडे बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. प्रत्यक्ष त्यावर कार्यवाही होत नाही. अशा विविध अडचणींनी हैराण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिले जावे, आदी मागण्यांसाठी धरणे धरण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

Manglwedha Election : नगरपालिकेचा कारभार चालवताना पतीचा हस्तक्षेप होईलच कसा?– भाजप उमेदवार सुप्रिया जगताप!

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबाचा गृहिणीला १० लाखांचा गंडा

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT