Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : शिवसेना अन् शिवसेना भवन हेच हिंदुंसाठी आशास्थान; हिंदू मोर्चाबद्दल राऊत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः लव जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. शिवसेना आणि शिवसेना भवन हेच हिंदूंचं आशास्थान असल्याचं आज सिद्ध झालं, असं राऊत म्हणाले.

'आज सखल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला. शिवसेना भवनासमोर त्याचं विसर्जन झालं. याचा अर्थ असाय की शिवसेना आणि शिवसेना भवन हिंदुंसाठी एकमेव आशास्थान आहे. बाकी हिंदू नेते आणि संघटना अपयशी आहेत.'

...तरीही आक्रोश मोर्चाची गरज पडतेय- राऊत

आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. तरीही आक्रोश मोर्चा काढायची गरज पडू शकते, हे दुर्दैव आहे. शिवसेना भवनासमोर जमलेल्या सकल हिंदू समाजाने याविरोधात आक्रोश केल्याचं राऊत म्हणाले.

'भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद'

राहुल गांधींनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा केली. भारत जोडण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यांच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी काश्मीरच्या चौकात तिरंगा फडकावून देशाला संदेश दिला आहे. युद्धापेक्षा प्रेमाने अनेक गोष्टी जिंकता येतात आणि देशाचं रक्षण करता येतं, हे राहुल गांधींनी सिद्ध केल्याचं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT