Supreme Court  
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

दंगलीत हरवलेल्या पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची सूचनाही कोर्टानं केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या सन १९९२च्या दंगलीतील खटले लवकरात लवकर निकाली काढा, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं आज राज्य सरकारला दिले. तसेच दंगलीत हरवलेल्या पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईची अंमलबजावणी करण्याची सूचनाही कोर्टानं केली आहे. (Mumbai Riots Settle cases of 1992 Mumbai riots Supreme Court direction to Maharashtra government)

उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले होते. त्याचा परिणाम म्हणजे मुंबईत ६ डिसेंबर १९९२ रोजी दंगल उसळली होती. यामध्ये मोठा नरसंहार झाला होता. सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचं मोठं नुकसानंही झालं होतं.

या दंगलीच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारनं २५ जानेवारी १९९३ रोजी मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन न्यायमूर्ती श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला होता. आयोगाच्या शिफारशी २०२२ मध्ये राज्य सरकारने स्वीकारल्या मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. (Latest Marathi News)

४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्यामुळं सुप्रीम कोर्टाचे न्या. अभय ओक आणि न्या. उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं सरकारला फटकारलं होतं.

तसेच राज्याचे पोलीस महासंचालक व गृह विभागाच्या सचिवांना आयोगानं सुचवलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही यावेळी सुप्रीम कोर्टानं दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT