Devendra Fadnavis and Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Savarkar Row : सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन का मिळायची'? नाना पटोलेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा - मागील चार ते पाच दिवसांपासून विनायक सावरकर यांच्याबाबतचा वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून राहुल गांधी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. त्याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Nana Patole news in Marathi)

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांनी सावरकरांना ब्रिटिशांकडून ६० रुपये पेन्शन का मिळत होते, हे आधी स्पष्ट करावे. या आठवड्याच्या सुरुवातीला 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली आणि भीतीपोटी त्यांनी इंग्रजांना दयेचा अर्ज लिहिला, असा दावा राहुल यांनी केला होता.

दरम्यान आपण सावरकर यांच्याविषयी जे काही बोललो ते पुराव्यानिशी बोललो. सावरकर यांच्याविषयी भाजपला जे वाटते ते म्हणणे त्यांनी मांडावे. त्याला आमचा विरोध नाही. संविधानाने सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. आमचा मार्ग अहिंसेचा आहे. आम्हाला कोणाला दबावात ठेवायचे नाही. ‘भारत जोडो’ यात्रेचा उद्देशच द्वेषाच्या विरोधात आहे,’’ असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT