CONGRESS PATOLE PRESS
CONGRESS PATOLE PRESS ESAKAL
महाराष्ट्र

नाना पटोलेंचा गौप्यस्फोट! पहाटेच्या शपथविधीनंतर कॉंग्रेसला होती मुख्यमंत्रीपदाची संधी

तात्या लांडगे

सोलापूर : पहाटेचे सरकार पडल्यानंतर राज्याची आवस्था बिकट झाली होती. त्यावेळी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची मोठी संधी होती. तरीही, आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी भाजपला सत्तेपासून रोखणे आणि शेतकरी, सर्वसामान्यांच्या विकासाचा 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'नंतर महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्तेसाठी नाही तर विकासाच्या मुद्‌द्‌यावर आम्ही एकत्रित आलो. पण, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष राहील. एक कुटुंब एकत्रित आल्यानंतर भांड्याला भांडे लागणारच, तरीही आम्ही स्वबळावर लढण्यासही तयार असल्याचे श्री. पटोले यांनी सोलापुरात स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले हे सोलापुरातील ओबीसींचा मेळावा आणि सोलापूर शहर कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने आज (रविवारी) सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी शहर कॉंग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, त्यांनी यावेळी राज्यातील विरोधी भाजप आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले, पहाटे शपथविधी होऊन नवे सरकार स्थापन झाले, पण ते सरकार पडल्यानंतर सर्वच पक्षांची आवस्था काय झाली होती. त्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवले असते तर निश्‍चितपणे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. पण, सोनियाजींनी सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली. दरम्यान, आता प्रत्येक पक्षाने स्वबळाची भाषा केली असून आम्हीही त्यासाठी तयार आहोत. कॉंग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून शेतकरी, बेरोजगारी, गरिबी या मुद्‌द्‌यावर आम्ही जनतेत जात आहोत. निश्‍चितपणे आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल ही 'पांढऱ्या दगडावरील पांढरी रेघ' असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ईडी, सीबीआय चौकशी करताय, मग जबाबाला का घाबरायच
भाजपच्या विरोधातील पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीला बोलावले जाते. त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. मग, फोन टॅपिंग प्रकरणातील जबाबासाठी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबासाठी बोलावल्यानंतर घाबरायचे आणि त्याचे राजकारण करण्याची गरज काय, असे श्री. पटोले म्हणाले. दरम्यान, रश्‍मी शुक्‍ला त्याठिकाणी काम करीत असताना त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते, त्यांना कोणी परवानगी दिली, याची चौकशी होणारच ना. मुळात भाजपला लोकशाही, संविधान मान्य नसल्याने ते आपल्यावर काहीतरी आले की गोंधळ निर्माण करीत असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

हिंदु-मुसलमानात वाद लावून जिंकली निवडणूक
देशात बेरोजगारी व गरिबी वाढली असून शेतकरी व व्यापारी अडचणीत सापडला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने दिलेल्या घोषणांना बगल देऊन पाच राज्यातील निवडणुकीत विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपने हिंदु व मुसलमान यांच्यात भांडण निर्माण करून चार राज्यात यश मिळविल्याची टीका प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले. देशाच्या केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंत पोहचलेले सुशिलकुमार शिंदे यांचे नेतृत्व त्यांनी जातीच्या राजकारणातूनच संपविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT