Narayan Rane and Vinayak Raut 
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : शरद पवार कृषीमंत्री होणार का? नारायण राणे म्हणाले...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नारायण राणे आपल्या आक्रमक शैलीसाठी सर्वांना परिचीत आहेत. त्यांनी आज अत्यंत आक्रमकतेने उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊथ यांच्यावर जोरदार टीका केली. राणे यांनी आज स्वातंत्र्य दिनीच विनायक राऊत यांची औकात काढल्याचं दिसून आलं.

नारायण राणे म्हणाले की, आज 77 वा स्वतंत्र दिवस आहे, आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या प्रगतीबद्दल विचार मांडले. तसेच कारागिरांच्या प्रगतीसाठी PM विश्वकर्मा योजनेची घोषणा केली

विनायक राऊत यांच्या उपोषणाबाबत विचारले असता राणे म्हणाले की, कोण विनायक राऊत ? काय औकात आहे त्यांची ? 10 वर्षांत काही योजना आणली का? काय उपोषण करता... हवं तर बिर्याणी पाठवतो.

दरम्यान 36 जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. तिघे होते तरी काही करू शकले नाहीत... आता कमी जास्त झाले तरी काही होऊ शकत नाही. काँग्रेसचे काही जण आमच्याकडे येणार आहेत. शरद पवार कृषीमंत्री होणार का? याबाबत विचारले असता, तो माझा विषय नाही, मोदी आणि शाह त्यावर बोलतील, असं राणे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT